प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील शिवापूर-वसोली सीमेवर रविवारी सकाळी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान मधमाश्यांनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाश्या चिडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी वाहनांतून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.









